चंद्रकांत पाटलांना शिवसेनेचा झटका; खानापूर ग्रामपंचायत जिंकली
खानापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर या मूळ गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने पाटलांना मोठा झटका दिला आहे. खानापूर गावातील 6 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाचा येथे विजय झाला आहे.
वाचा :-कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा
गारगोटीजवळ असलेल्या खानापूर गावात शिवसेनेने ९ पैकी सहा जागा जिंकून चंद्रकांत पाटलांना धक्का दिला आहे. तर काँग्रेसला एक व भाजपाला दोन जागा मिळाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे खानापूरमध्ये भाजपाचीच सत्ता होती. यंदा निवडणुकीत शिवसेनेला थोपविण्यासाठी भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युतीदेखील केली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली होती. अशातही शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळविला आहे.