चंद्रकांत दादा…दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! : जलसंपदा मंत्री जयंत पाटील
महाराष्ट्रधर्म’ पाळण्याचे आदेश दिले असते तर अधिक संयुक्तिक ठरले असते…
मुंबई |महाईन्यूज | प्रतिनिधी
दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.
भाजपच्यावतीने महाविकास आघाडीच्या विरोधात ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन शुक्रवारी पुकारले आहे. मात्र हे आंदोलन करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोणत्या घोषणा आणि वस्र कशापध्दतीने वापरायची याची एक नियमावली कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी काढली आहे याचाच समाचार जयंत पाटील यांनी घेतला आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा ‘महाराष्ट्रधर्म’ पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते तर अधिक संयुक्तिक ठरले असते असे खडेबोल जयंत पाटील यांनी सुनावले आहेत.