breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘गणराया, गिरीष बापटांना सुबुध्दी दे’; पुण्यात पाण्यासाठी काॅंग्रेसचे अनोखे आंदोलन

पुणे  –  गणराया ‘गिरीष बापटांना सुबुध्दी दे’ असे साकडे घालत आज (बुधवारी) पुण्यातील कसबा गणपती येथे काँग्रेसच्या वतीने पाण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले.

शहराच्या पाणीसाठ्यात कपात होऊ नये, वर्षाकाठी 16 टिएमसी पाणी मिळावा यासाठी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. पाणीसाठ्यात कपात करण्याच्या प्राधिकरणाच्या निर्णयानंतर पाणीकपातीची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.  अद्याप पाणी कपात होणार नसली तरी भविष्यात पाणी कपात होऊ शकते. त्यामुळे पुणेकरांसमोर पाणी प्रश्न  उपस्थित आहे. या पार्श्वभुमीवर पुणेकरांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन केले गेले. यावेळी कसबा गणपती समोर भजन किर्तन करुन पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गणरायाला साकडे घातले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button