कोरोना नंतर तुफान पावसातही मुंबईकरांच संरक्षण करणाऱ्या पोलिसांच सुप्रिया सुळेंनी केलं कौतूक
महाराष्ट्रासह मुंबईत गेले काही महिने कोरोना विषाणूचा संसर्ग तर आहेच मात्र गेल्या २ दिवसांपासून मुंबईला तुफान पावसाला तोंड द्याव लागतय. मुंबई पोलीस कोरोनाच्या संकट काळात देखील अहोरात्र काम करत होते. आणि आता पावसात देखील आपली कामगिरी चोख बजावत आहेत. त्यांच्या या चोख कामगिरीला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुजरा केलाय.
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी २ दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून मुंबईत राहणे असुरक्षित आहे असं बोलत मुंबई पोलिसांच्या कामावर अविश्वास दाखवला होता. त्यांच्या या ट्विटमुळे अनेकांनी त्यांच्यावर पलटवार केला होता. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांमुळे आपण सुरक्षित आहोत असं ट्विट करत अप्रत्यक्षपणे अमृता फडणवीस यांना टोला लगावलाय.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे की , ”आपली मुंबई सुरक्षित आहे ही मुंबई पोलीस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच.तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट”, मुंबईत झालेल्या तुफान पावसामुळे अनेक भागात पाणी भरले होते. सेंट्रल रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्याने लोकांना एनडीआरएफ यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.