breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावलं

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहेत. यानुसार आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात आला आहे.

उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्य शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांसह अन्य काही जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

राज्यात वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहता राज्य सरकारने महाराष्ट्र लॉक डाऊनचा निर्णय अखेर घेतला आहे. सोबतच पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेला जनता कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. त्यानुसार उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत हा कर्फ्यू राहणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्यातील काही शहरांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button