कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी
संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेल्या तीन कृषी विधेयकांवर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करुन मान्यता दिली आहे. या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. मात्र दुसरीकडे ही विधेयकं शेतकर्यांंच्या हिताची नसल्याचे म्हणत अजुनही देशभर त्यास विरोध होत आहे. यावरुनच भाजपाचा मित्र पक्ष शिरोमणी अकाली दल याने NDA मधुन आपला सहभाग देखील काढुन घेतला आहे.
महाराष्ट्रात सुद्धा या विधेयकांप्रति विरोधी भावना आहेत, महाविकासआघाडी सरकार हे या विधेयकांंच्या विरोधात असुन आपण हा कायदा राज्यात लागुच होऊ देणार नाही अशी घोषणा महाराष्ट्र राज्य महसुल मंंत्री बाळासाहेब थोरात यांंनी केली आहे.थोरात यांंनी काही वेळापुर्वी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, संसदेत मंंजुरी मिळालेले विधेयकंं हे शेतकरी विरोधी आहे.त्यामुळे आम्ही सुद्धा त्याच्या विरोधात आहोत. महाविकास आघाडी संपुर्णतः या विधेयकाच्या विरोधात आहे, हे विधेयकं महाराष्ट्रात लागु होऊ देणार नाही शिवसेना सुद्धा आमच्या सोबत आहेत, यासाठी एक कमिटी स्थापन करुन पुढील कामाची आखणी केली जाईल.