breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कृषी उद्योगाला १ लाख कोटींचं पॅकेज जाहीर
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसच्या काळात भारतासाठी 20 लाख कोटींच्या विशेष निधीची घोषणा केली. अर्थमंत्री निर्माला सितारमण आर्थिक पॅकेजच्या तिसर्या टप्प्यातील तपशील देत आहेत. शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. पूर आणि दुष्काळातही शेतकरी झटला. शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमध्येही अन्नधान्याचा पुरवठा केला. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं. कृषी उद्योगाला 1 लाख कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी पॅकेज देण्यात येत आहे. शेती, सिंचन, पशुपालन, मच्छीमारी यांसाठी आज पॅकेज जाहीर करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.