breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

काॅंग्रेसचे नेते राहूल गांधीना केंद्रीय समाजकल्याण मंत्र्यांनी हा दिला सल्ला

पिंपरी |महाईन्यूज|

काॅंग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांना केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, ‘हम दो, हमारे दो’ हा नारा राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी ‘हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने लग्न करावे, असेही आठवले म्हणाले.

कासारवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. ते पुढे म्हणाले, नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधातील नाही. मात्र, या कायद्यांबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. जिथे जास्त पैसे मिळतील, तिथे शेतकरी आपला माल विकू शकतात. इतकेच सध्याच्या केंद्रीय कृषी कायद्यात आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधातील नाही. शेतकरी आहेत म्हणूनच आम्हाला खायला मिळत आहे, याची आम्हाला कल्पना आहे.

राहुल गांधी हे शेतकरी आंदोलनाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न करतात. देशातील सर्व शेतकरी कायद्याच्या विरोधात नाहीत. पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकरी या कायद्यांना विरोध करत आहेत. देशातील मूळ शेतकरी आंदोलनात आलेला नसल्याचे आठवले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button