breaking-newsराष्ट्रिय
काश्मीरमध्ये चकमकीत चार जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये भारताचे चार जवान शहीद झाले आहेत. यात एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. बाबागंद भागात चकमकी दरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलाचे निरीक्षक, जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे दोन जवान या चकमकीत शहीद झाले.
चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे असे सुरक्षा दलांना वाटले होते. पण पाडलेल्या घराच्या ढिगाऱ्यामधून उठून या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला असे सूत्रांनी सांगितले.
सीआरपीएफच्या कमांडटसह आठ जण या चकमकीत जखमी झाले आहेत. आज सकाळी दोन दहशतवाद्यांचा चकमकीत ठार मारल्याचे सुरक्षा दलांकडून सांगण्यात आले.