breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

कार विहिरीत कोसळली, पाच जण जागीच ठार

सांगली |महाईन्यूज|प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील झरे गावाजवळ कार विहिरीत कोसळली आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. यामध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील झरे-पारेकरवाडी रोडवर ही घटना घडली. वॅगनार गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडली. त्यामुळे कारमधील पाच जणांचा गाडीतच बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

चितळी जिल्हा सातारा येथील नातेवाईकाच्या धन विधीसाठी जाताना ही घटना घडली. यामध्ये पारेकरवाडी येथील नागरिक गावापासून जवळ असणाऱ्या विहिरीमध्ये पडले. यामध्ये पाच जण मृत्युमुखी पडले एकजण काच फोडून बाहेर आल्याने बचावला आहे. मच्छिंद्र पाटील (60), कुंडलीक बरकडे (60), गुंडा डोंबाळे (35), संगीता पाटील (40), शोभा पाटील (38) अशी मृतांची नावे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button