breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

औरंगाबादनंतर जालन्यातही दहा दिवसांसाठी संचारबंदी लागू…

औरंगाबादनंतर आता जालन्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं दहा दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काल मध्यरात्रीपासूनच ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी संचारबंदीचं काटेकोरपालन करावं म्हणून प्रशासन खास लक्ष ठेवून आहे.

जालना शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत चालली आहे सोमवारी शहरात ६९ नवीन कोरोना रूग्ण सापडले आहेत तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५ रुग्ण कोरोनाग्रस्त झाले आहेत. शहरात रविवारी मध्यरात्री पासून येत्या दहा दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ४१६ बरे झालेल्यांना आतापर्यंत सुट्टी देण्यात आली आहे…

आतापर्यंत जालण्यात एकूण ६९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे जालना शहरातील असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. तर आतापर्यंत एकूण २६ कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. संचारबंदीची अतिशय कडक अंमलबजावणी केली जात आहे शहरातील विविध भागात रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पोलिस यंत्रणा सतर्कतेने उभी आहे. जिल्ह्यात एकूण ८०० कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झाली आहे यात ३५७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button