breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

ऑकलँडमधील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा पराभव…तर, न्यूझीलंडचा 22 धावांनीं विजय…

टीम इंडियाविरुद्ध ऑकलँडमधील दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 22 धावांनीं विजय मिळवला. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत किवी संघाने दिलेल्या 274 धावांच्या प्रत्युत्तरात भारताला 251 धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यासह भारताला तीन वनडे सामन्यांची मालिकासुद्धा गमवावी लागली. टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाने आज फलंदाजीने निराश केले.

श्रेयस अय्यर आणि जडेजाला वगळता अन्य कोणताही फलंदाजाला धावा करण्यात यश मिळाले नाही. दरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. यासोबतच त्याने जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला संघातून वगळ्याचा निर्णय कोहलीने घेतला. मालिकेतील महत्त्वपूर्ण सामन्यातून शमीला बाकावर बसवल्याने सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. बऱ्याच क्रिकेट प्रेमींना हा निर्णय रुचलेला नाही, असे प्रतिक्रियावरुन दिसून येते. माजी क्रिकेटर हरभजनने विराटचा निर्णय पटणारा नाही असे म्हटले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button