breaking-newsताज्या घडामोडी
उद्योग आणि शेतीची सांगड घालण्याची गरज- मुख्यमंत्री
औरंगाबाद | महाईन्यूज | उद्योग आणि शेतीची सांगड घालण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद येथे उद्योजकांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
बिडकीन येथे ५०० एकर वर आपण अन्न प्रक्रिया उद्योग उभारणार आहे. त्यात महिलांना आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. जून २०२० मध्ये याचे भूमिपूजन करणार असून वेळ न दवडता काम करणार असल्याचे ते म्हणाले. जिथे यांत्रिकिकरण होतंय त्याच स्वागत आहे. पण भूमीपुत्रांना कष्टाचे दोन घास मिळावे ही जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी असे झाले तर महाराष्ट्र महाशक्ती बनवण्याचे काम हे सरकार करेल असेही ते म्हणाले.