breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आषाढीवारी पालखी सोहळ्यास दीड कोटी रुपयांचा निधी

पुणे –  संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला विविध सेवासुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकारकडून १ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून वारकऱ्यांसाठी शौचालय, पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, निवारा, वीज पुरवठा, रस्ते आणि वाहतूक आदी सेवा पुरविण्यात येणार आहे.

तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान २४ जून रोजी देहू येथून, ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान २५ जून रोजी आळंदी येथून होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, अमर माने, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे उपस्थित होते.

‘ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज पालखी सोहळा आनंदात आणि स्वच्छतापूर्ण होण्यासाठी तालुक्यातील गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी काटेकोर नियोजन करावे. वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पाणी, वीज आणि वैद्यकीय सुविधांमध्ये गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच पालखीतळ आणि परिसराची स्वच्छता करून घ्यावी,’ असे आवाहन देवकाते यांनी अधिकाऱ्यांना केले. ‘पुणे जिल्ह्यातून संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत सोपान महाराज, संत गोरा कुंभार आणि संत निळोबाराय पालखी सोहळा मार्गस्थ होतो.

या सोहळ्यात दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. वारकऱ्यांसाठी शौचालय, पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, निवारा, वीजपुरवठा, रस्ते, वाहतूक आदी मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदही शौचालय, पाणी, स्वच्छता आणि वैद्यकीय सेवा देते. यंदा सरकारने १ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी दिली आहे. हा निधी तालुकास्तरावर पाठविण्यात येणार असून, त्यातून विविध विकासकामे करावीत,’ असे आदेश गावडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button