breaking-newsआरोग्यमहाराष्ट्र
आरोग्य विभागात 17 हजार जागा मुलाखतीशिवाय लवकरच भरणार : राजेश टोपे
औरंगाबाद : “आरोग्य विभागात आता मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे”, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार औरंगाबादेत पोहोचले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.