आमिरलाच आवडला नाही “कयामत से कयामत तक’
आमिरने “कयामत से कयामत तक’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याला आता तीन दशके पूर्ण झाली आहेत. रोमॅंटिक थीमच्या त्याच्या पहिल्याच सिनेमाला अभूतपूर्व यश मिळाले होते. याच सिनेमाने सगळ्या देशभर आमिरची ओळख निर्माण केली होती.
मात्र या सिनेमातल्या आपल्याच कामाबद्दल आमिरने आता तीन दशकांनंतर चक्क नाखूषी व्यक्त केली आहे. आपल्याच कामाबद्दल तेंव्हाही आमिर खूष नव्हता. संपूर्ण सिनेमाचे शुटिंग नव्याने करण्याची आवश्यकता असल्याचे तेंव्हा त्याने डायरेक्टरना सांगितले होते. सगळ्यांना जुहीचे काम आवडेल असा त्याचा अंदाज होता. मात्र सिनेमात आमिरचे काम लोकांना खूप आवडले आणि सिनेमा सुपरहिट झाला. याचा आमिरला आश्चर्याचा धक्काच बसला होता. अगदी अलिकडे एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने ही हकिगत सांगितली.
याच सिनेमामध्ये “अकेले है…’ या गाण्यात जुहीने आमिरला कीस करण्याचा सीन होता. पण ऐनवेळी जुहीने या सीनला नकार दिला होता. त्यामुळे डायरेक्टर मन्सूर खाननी 10 मिनिटांसाठी शुटिंग थांबवले आणि जुहीला या सीनचे महत्व समजावून सांगितले. तेंव्हा कुठे बाईसाहेब तयार झाल्या होत्या. या गाण्यातली स्क्रीप्टची गरज म्हणून तिने या सीनला तयारी दर्शवली होती.