breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

आता प्रत्येक जिल्ह्यात एक मुख्यमंत्री कार्यालय – उद्धव ठाकरे

नागपूर | महाईन्यूज |

मुंबई मंत्रालयात ग्रामीण भागातून अनेक जण येतात. ग्रामीण भागातील नागरिकांना मुंबईला अनावश्यक यावं लागू नये, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.

नागरिकांना कोणतीही मदत, काहीही लागलं तर त्यांना मुंबईऐवजी तिथे ते जाऊ शकतील. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, असही त्यांनी यावेळी म्हटलं.राज्यातील आदिवासी बांधवांसाठी दरवर्षी बजेटमध्ये लोकसंख्येच्या आधारावर तरतूद करू. तो पैसा त्यांच्यासाठीच खर्च करू, असेही ठाकरे म्हणाले. तसंच राज्यात अनेक ठिकाणी हायवेला जोडणारे रस्ते व्यवस्थित नाहीत, ती दुरावस्था संपूर्ण महाराष्ट्रात आहे. हे सुधारवण्यासाठी चालना देऊ. यासाठी केंद्राकडे विचारू, नाही मिळालं तर दुसरा पर्याय बघू, असही आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं.

विदर्भासाठी समृद्धी महामार्गाला लागणा-या निधीबाबतही घोषणा केली.हा समृद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करुन या मार्गासाठी लागणारा निधी सरकारचं भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महामार्गाच्या आजूबाजूला कृषी समृद्धी केंद्रे विकसित करण्याचा विचार असून ह्यातून पाच लाख लोकांना रोजगार मिळेल, असेही ठाकरे यांनी म्हटलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button