breaking-newsमहाराष्ट्र

अमरावती जिल्हात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू – पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावती : अमरावती जिल्हात इतर जिल्ह्याप्रमाणे पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येईल अशा चर्चांना उधान आले होते. मात्र काल अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या सोबत बैठक घेतली व अमरावती जिल्हात सध्या तरी लॉकडाऊन नसल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

तर जिल्ह्यात शनिवारी व रविवारी दोन दिवस जनता कर्फ्युची घोषणा पालकमंत्री ठाकुर यांनी केली आहे. अमरावती शहर व जिल्ह्यात आळी-पाळीने सुरू असलेले दुकाने 31 जुलैनंतर बंद होऊन सर्व दुकाने पूर्ण वेळ चालू राहण्याची घोषणाही यशोमती ठाकुर यांनी दिली. त्यामुळे आता जिल्ह्यातील दुकानदार व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button