breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#WarAgainstCorona: २० एप्रिलनंतर राज्यातील उद्योग सुरू होणारः उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधिन राहून राज्यातील उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने तयारी केली आहे असून याच अनुषंगाने आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उद्योग सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना उद्योग विभागाच्या सचिवांना करण्यात आल्या.

 यावेळी श्री. देसाई म्हणाले की, उद्योगांना आर्थिकदृष्ट्या चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने पाठविलेल्या मार्गदर्शक सूचना महत्वाच्या आहेत. या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन येत्या २० तारखेनंतर राज्यातील कोणत्या भागांतील उद्योग सुरू करता येतील, याचा आज आढावा घेऊन एक सूत्र तयार केले आहे. त्यानुसार ज्या भागात कोरोनामुळे प्रतिबंध लागु आहे अशा ठिकाणी उद्योग सुरू करता येणार नाहीत. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, पनवेल, वसई-विरार, भिवंडी, पुणे- चिंचव़ड तसेच नागपूर या भागांचा समावेश असेल. इतर ठिकाणी आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाशी सल्लासलत करून परिस्थितीनुसार २१ तारखेच्या आसपास उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्योग विभागाच्या कृतीदलाने याबाबत तयार केलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.

या अटींवर सुरू करता येईल उद्योग

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी उद्योगांना चालना देण्यासाठी उद्योग विभागाने काही अटी व नियम तयार केले आहेत. त्यात जे उद्योग आपल्या कामागारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करतील, त्यांना उद्योग सुरू करण्यास परवानागी दिली जाईल. दुसरे असे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे उद्योग नियम पाळतील व वाहतुकीची व्यवस्था करतील त्यांनी देखील सूट दिली जाईल. एमआयडीसीमध्ये लघु उद्योगांनी एकत्र येऊन कामगारांची राहण्याची सोय केल्यास उद्योग विभाग त्यांना मदत करेल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

कृषी आधारित उद्योगांना प्राधान्य

 साधारणपणे रोजगार गमावलेल्या लोकांना उत्पादनाचे साधन मिळावे, हाताला रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्योग सूरू करण्यामागचा हेतू आहे. हे करताना शेती आधारित उद्योगांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामांसाठी मदत होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button