… अनैसर्गिकरित्या महाविकास आघाडीचे सरकार आलंय – हर्षवर्धन पाटील
पिंपरी |महाईन्यूज|
महाराष्ट्रातील तमाम जनतेनं भाजपवर विश्वास व्यक्त केला, पण काही लोकांनी आपल्याला फसवलं आणि अनैसर्गिकरित्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. आता हे सरकार योग्य की अयोग्य आहे, नितिमत्तेने वागतेय की गैरमार्गाने याला उत्तर देण्याचे वेळ आली आहे. त्यामुळे पदवीधर व शिक्षक निवडणूकीला फार महत्व असून त्यात भाजप निश्चित विजय होईल, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या प्रचारार्थ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मेळावा घेण्यात आला. त्यात फडणवीस बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उमेदवार संग्राम देशमुख, महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी सभापती संतोष लोंढे, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, सदाशिव खाडे, माजी महापौर राहूल जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, बिहारचे एक्झिटपोल वेगळेच अर्थ सांगत होते. ख-या अर्थाने जनतेत काम केल्यामुळे बिहार निवडणुकीत भाजपची सत्ता आली. बिहार निवडणुकीतच नव्हे तर देशभरातील निवडणुकीत भाजपवर जनतेने विश्वास दाखविला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील लवकरच भाजपचीच सत्ता येणार आहे. असेही त्यांनी भावना व्यक्त केली.