breaking-newsराष्ट्रिय

अनुच्छेद ३७० बाबत १ ऑक्टोबरपासून सुनावणी

महाईन्यूज | प्रतीनिधी

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवर पाच न्यायाधीशांचे घटनापीठ १ ऑक्टोबरपासून सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या घटनापीठाची स्थापना शनिवारी केली असून त्याचे नेतृत्व न्या. एन. व्ही.रमण हे करणार आहेत.

केंद्र सरकारने ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द केल्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्या. एस. के. कौल, न्या. आर. सुभाष रेड्डी, न्या. बी.आर गवई व न्या. सूर्यकांत यांचाही या घटनापीठात समावेश आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ ऑक्टोबरपासून या याचिकांची सुनावणी करण्यात येणार आहे.

पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडून हे कलम रद्द करण्याच्या निर्णयाची तसेच राष्ट्रपतींनी जारी केलेल्या अध्यादेशांची वैधता तपासली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button