breaking-newsराष्ट्रिय
अनुच्छेद ३७० बाबत १ ऑक्टोबरपासून सुनावणी
महाईन्यूज | प्रतीनिधी
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवर पाच न्यायाधीशांचे घटनापीठ १ ऑक्टोबरपासून सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या घटनापीठाची स्थापना शनिवारी केली असून त्याचे नेतृत्व न्या. एन. व्ही.रमण हे करणार आहेत.
केंद्र सरकारने ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द केल्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्या. एस. के. कौल, न्या. आर. सुभाष रेड्डी, न्या. बी.आर गवई व न्या. सूर्यकांत यांचाही या घटनापीठात समावेश आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ ऑक्टोबरपासून या याचिकांची सुनावणी करण्यात येणार आहे.
पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडून हे कलम रद्द करण्याच्या निर्णयाची तसेच राष्ट्रपतींनी जारी केलेल्या अध्यादेशांची वैधता तपासली जाणार आहे.