breaking-newsराष्ट्रिय

अग्नी 5 लवकरच सैन्याच्या ताफ्यात; संपूर्ण चीन आता भारताच्या टप्प्यात

नवी दिल्ली : लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यात सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्राचा समावेश आहे. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 सुरक्षा दलांच्या ताफ्यात येताच भारताचं सामर्थ्य कित्येक पटींनी वाढेल. अग्नी 5 ची मारक क्षमता तब्बल 5 हजार किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे संपूर्ण चीन भारताच्या टप्प्यात येईल. चीनच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करण्याची क्षमता अग्नी 5 मध्ये आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 हजार किलोमीटरची मारक क्षमता असलेली अग्नी 5 ही क्षेपणास्त्र प्रणाली अण्वस्त्रदेखील वाहून नेऊ शकते. लवकरच अग्नी 5 स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सुपूर्द करण्यात येईल. देशातील अत्यंत आधुनिक क्षेपणास्त्र स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवली जातात. मात्र याआधी अग्नी 5 च्या विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. सुरक्षा क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार, पेइचिंग, शांघाय, गुआंगझाऊ या शहरांसह चीनमधील कोणत्याही भागाला अग्नी 5 च्या माध्यमातून लक्ष्य केलं जाऊ शकतं.

गेल्या महिन्यात ओडिशाच्या किनारपट्टीवरुन अग्नी 5 ची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. अग्नी 5 स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवण्याआधी अशा आणखी काही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये या चाचणी घेतल्या जातील. अग्नी 5 मुळे देशाच्या युद्धसज्जता कित्येक पटीनं वाढेल, असा विश्वास एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं व्यक्त केला. ‘अग्नी 5 मधील नेव्हिगेशन यंत्रणा अतिशय अत्याधुनिक आहे. याशिवाय याची क्षमतादेखील इतर क्षेपणास्त्र प्रणालींपेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे,’ अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button