breaking-newsराष्ट्रिय
अग्नितांडव : दिल्लीतील अपघाताच्या मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडूनही मदत
राजधनी दिल्लीतील एका फॅक्ट्रीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घडली. यामध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. शिवाय अनेकांना वाचवण्यात यश आलेले आहे. आगीत होरपळलेल्यांना तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे, मात्र त्यामधील काहींची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाच्यावतीने पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींसाठी ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे.