breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अहमदनगर जळीतकांड प्रकरणाला नवे वळण
अहमदनगर – अहमदनगर येथे झालेल्या कथित जळीत ऑनर किलिंग प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण लागलं आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे मंगेश आणि रुक्मिणी यांना मुलीच्या वडिलांनी पेटवल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता या प्रकरणी पोलिसांनी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या अहवालानुसार, मंगेश आणि रुक्मिणी या जोडप्याला मुलीच्या वडिलांनी नाही तर स्वत:च्या पतीनेच पेटवलं असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी सादर केलेल्या या अहवालामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.