breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहमदनगर जळीतकांड प्रकरणाला नवे वळण

अहमदनगर – अहमदनगर येथे झालेल्या कथित जळीत ऑनर किलिंग प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण लागलं आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे मंगेश आणि रुक्मिणी यांना मुलीच्या वडिलांनी पेटवल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता या प्रकरणी पोलिसांनी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या अहवालानुसार, मंगेश आणि रुक्मिणी या जोडप्याला मुलीच्या वडिलांनी नाही तर स्वत:च्या पतीनेच पेटवलं असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी सादर केलेल्या या अहवालामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावात राहणाऱ्या मंगेश आणि रुक्मिणी या तरुण-तरुणीने घरच्यांचा विरोध अशताना आंतरजातीय विवाह केला. यानंतर रुक्मिणीच्या वडिलांनी आम्हाला एका खोलीत बंद केलं आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार पाच तारखेला मंगेश याने पोलिसांकडे दिली होती.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button