पिंपरी / चिंचवड

शिक्षणाच्या व्यवसायिकरणाने शिक्षण घेणे अवघड – दीपक पुजारी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – कर्मचारी भाऊराव पाटील यांनी स्वत:च्या पत्नीच्या अंगावरील दागिने विकून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पण, सध्याचे शिक्षण म्हणजे शिक्षण नसून व्यवसायिकरण झाले आहे. म्हणून सर्वसामान्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे, अशी खंत मीरा भाईंदर महापालिकेचे उपायुक्त दीपक पुजारी यांनी व्यक्त केली.

काव्यमित्र संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे समाजसेवक व उद्योजक यांच्या पुरस्कार समारंभाचे आयोजन पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, गायत्री इंग्लिश मिडियम स्कूलच्या संचालिका कविता भोंगाळे, उद्योजक विष्णू थिटे, अ‍ॅमिटी विद्यापीठाचे संचालक डॉ. अनिल वारियाथ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये सुभाष जंगम, गुरुनाथ होगाडे, इंद्रजित दुबे यांना (कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणरत्न पुरस्कार), डॉ. राजाभाऊ भैलुमे, डी. बी. कोकरे, राजेश मापारी, धर्मेंद्र भांगे, कैलास कर्पे यांना (कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षरत्न पुरस्कार), भीमराव महाराज हांडे, अवधेश पांडेय, नवनाथ मोरे, एच. व्ही. चव्हाण, बाबूराव पुजारी यांना (समाजभूषण पुरस्कार), तर शेखर अमराळे, विक्रम शिंदे, संजय वहिले, प्रदीप बेलकर, भीमाशंकर जेवळे, कल्पना चिकणे यांना (सेवाभावी उद्योजक पुरस्कार) प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन राजेंद्र सगर यांनी केले होते.

गणेश पुंडे यांनी प्रास्ताविक केले. बाबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. हरिनाथ कांबळे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button