महापालिका जलनिःस्सारण विभाग झोपलाय का?; मैलामिश्रित पाणी जातेय थेट नदी पात्रात (VIDEO)
- नागरिकांच्या आरोग्याशी खेळतेय कोण?
- ड्रेनेज विभागाच्या अधिका-यांवर कारवाई करा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – थेरगाव गावठाण परिसरातील मैलावाहिन्यांचे चेंबर जुने व कमकुवत झाले आहे. या मुधन गळती होवुन मैलामिश्रित पाणी नदी पात्रात मिसळत आहे. मैलाशुध्दीकरण चेंबर फुटल्याने त्यातील मैलामिश्रित पाणी थेट पवना नदीपात्रात जात आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महापालिका ड्रेनेज विभागाचे अधिकारी झोपले आहेत का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. वृक्ष आणि नदी संर्वधनासाठी गप्पागोष्टी करतील, सर्व उपक्रम कागदोपत्री ठेवून अमंलबजावणी शून्य राहणार आहे. महापालिका जलनिःस्सारण विभाग व ठेकेदारांवर कारवाई करायला हवी. पर्यावरण विभागाने देखील दुर्लक्ष केले आहे.
थेरगाव परिसरात नाल्याशेजारी अनेक ठिकाणी चेंबर फुटल्याने मैलामिश्रित पाणी थेट पवना नदीच्या पाण्यात मिसळत आहे. आधीच प्रदुषित असलेल्या नद्यांमधुन हे मैलामिश्रित पाणी थेट मिसळत असल्याने नदी प्रुदुषणात भर पडत आहे. उरल्या सुरल्या जलचरांनाही यामुळे धोका निर्माण झाला आहे. तर नदीकिनारा भागातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत महापालिका मलनिस्सारण विभागाकडुन दुर्लक्ष होत आहे. तेथील रहिवाशी सांगतात की, कित्येक दिवसापासून अहोरात्र हे मैलापाणी थेट नदीपात्रात जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या मैलाशुद्धीकरण केंद्राचा उपयोग काय ? असा सवाल नागरीक विचारत आहेत. सध्या पावसालाही सुरूवात होईल, साथीचे आजाराचे प्रमाण देखील वाढेल, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य प्रश्न निर्माण झाला आहे.