breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मराठा आंदोलकांवरील खटले मागे न घेतल्यास मंत्रालयाला घेराव
मुंबई – मुंबईसह राज्यात आंदोलनादरम्यान मराठा समाजातील ज्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत ते दसऱ्यापूर्वी सरकारने मागे न घेतल्यास येत्या २७ ऑक्टोबर रोजी मंत्रालयाला वाहनांसह घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी आंदोलनाची घोषणा केली. ते म्हणाले की, सरकार समाजात बेकी माजवत आहे. शिवस्मारकाची उंची कमी करून त्याचा खर्च एक हजार ३०० कोटी रुपयांनी कमी केला आहे. कार्यकर्त्यांवर ३०७ कलमाखाली खोटे गुन्हे दाखल करण्याचे षड्यंत्रच रचल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला आहे.