जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांच्या कुटुंबियांचे दहशतवाद्यांकडून अपहरण
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचे ‘ऑपरेशन ऑलआउट’ चालू असून याअंतर्गत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आले आहे. सैन्याच्या या कारवाईमुळे दहशतवाद्यांनी आता पोलिसांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांनी मागच्या २४ तासात ८ नागरिकांचे अपहरण केले आहे. अपहरण झालेले हे आठही जण वेगवेगळ्या पोलिसांचे नातेवाईक असल्याचे समजत आहे.
सूत्रांनुसार, अपहरण झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सैन्य वरिष्ठ पातळीवर सर्च ऑपरेशन राबवत आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून दहशतवादी पोलिसांना टार्गेट करत असल्याचे दिसत आहे. बुधवारी दहशतवाद्यांनी चार पोलिसांची हत्त्या केली होती. त्याआधीही सैन्यांच्या जवानांचे अपहरण करून निघृण हत्या केली होती. या पार्श्ववभूमीवर सैन्याने हिट लिस्टवर असणाऱ्या दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.