RCB आयपीएल का जिंकत नाही? एम.एस.धोनीनं सांगितलं कारण; म्हणाला..
MS Dhoni : आयपीएल स्पर्धेला सुरूवात होऊन १५ वर्षे झाली आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाने तब्बल पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगरूळ संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. चेन्नईचा कर्णधार एम.एस. धोनीने आरसीबी आयपीएल ट्रॉफी न जिंकण्याचं कारण सांगितलं आहे.
एका चाहत्याने एम.एस.धोनीला आरसीबी का जिंकत नाही, ते आयपीएल ट्रॉफी कधी जिंकतील? असा प्रश्न केला. यावर तो म्हणाला, आरसीबी ही खूप चांगली टीम आहे. पण क्रिकेटमध्ये काही गोष्टी प्लॅनिंगनुसारच घडतील असं नाही. कारण तुमच्या समोरचाही संघ तयारीनीशी आलेला असतो. तरीही आपलं योग्य नियोजन असेल तर ते सुद्धा नक्की आयपीएल जिंकतील. तसेच हा चाहता धोनीला चक्क आरसीबी संघाचं नेतृत्व का करत नाही असंही विचारतो. यावर धोनी म्हणतो असं केलं तर माझे फॅन्स नाराज होतील.
हेही वाचा – संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात नेमकं काय बिनसलं? वाचा सविस्तर..
MS Dhoni's response when one of the RCB fan asked Dhoni to come and support RCB to win a title.
– This is 👏pic.twitter.com/mcvlfrMBwI
— Johns. (@CricCrazyJohns) December 20, 2023
एम.एस. धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १२ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेक RCB फॅन्सनं धोनीचे आभार मानले आहेत. शिवाय धोनीचा सल्ला RCB नं ऐकावा अशी विनंती आपल्या मॅनेजमेंटला केलीये.