breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#War Against Corona : महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे नेतील: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आहे. त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून राज्यातील जनतेला सत्यशोधक विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यावरील कोरोनाचं संकट लक्षात घेऊन सर्वांनी आपापल्या घरात थांबूनच क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचं… कार्याचं स्मरण करावं. जयंतीचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत व कुणीही घराबाहेर पडू नये, घरातंच रहा, सुरक्षित रहा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या कार्याचं… विचारांचं स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्व पटवून दिलं तसेच शिक्षणाची संधीही उपलब्ध केली. महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली करुन दिली. अनेक क्षेत्रात, महिला आत्मविश्वासाने जबाबदारी सांभाळताना दिसतात त्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला आहे. या दोघांनी समाजकार्याचा डोंगर उभा केला. अंधश्रद्धा… अस्पृश्यता… वाईट चाली-रिती… अनिष्ट रुढी-परंपरांवर कडाडून हल्ला चढवला. त्यासाठी त्रास, अपमान सहन केला. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांना… कष्टकऱ्यांना.. महिलांना… समाजातील दुर्बल… वंचित… उपेक्षित घटकांना हक्काची जाणीव करुन दिली व ते मिळवण्यासाठी बळ दिले. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांचं सामाजिक कार्य अलौकिक आहे. त्यांचं कार्य, विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आपण जयंतीच्या निमित्तानं करुया अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांच्या कार्याचं स्मरण करुन अभिवादन केले.

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यात काही ठिकाणी कृषी बाजार, भाजी मंडया थोड्या काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने लोकहितासाठी घेतला आहे. सरकारच्या या अल्पकालीन निर्णयाला संबंधित शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button