breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस; कृष्णा नदीच्या पुलावर चढले पाणी

सातारा – जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने अनेक भागाला झोडपून काढले. सातारा तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या जिहे येथील कृष्णा नदीच्या पुलावरून चक्क पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक काही तास बंद पडली होती. तसेच पुलावर चढलेले पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

ऐन हिवाळ्यात कोसळलेल्या अवकाळीच्या जोरदार कोसळलेल्या सरींमुळे जिहे- कठापुर ते कोरेगाव असलेल्या कृष्णा नदीला पूर आला होता. या नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पडली होती. वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागला. जोरदार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने ऊस,हरभरा,ज्वारी आणि आले सारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच ऊसतोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या झोपड्यांमध्ये पाणी गेल्याने त्यांचाही तात्पुरता संसार भिजून चिंब झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button