जायकवाडी धरणातून विसर्ग : गोदावरी नदीला पूर, अनेक मंदिरं पाण्याखाली; गावांना सतर्कतेचा इशारा
![Discharge from Jayakwadi Dam: River Godavari floods, many temples under water; Vigilance warning to villages](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/गोदावरी-नदीला-पूर-अनेक-मंदिरं-पाण्याखाली-नदीकाठच्या-गावांना-सतर्कतेचा-इशारा.jpg)
बीड : जायकवाडी धरण ९० टक्क्यांपर्यंत भरले असून धरणाच्या १८ दरवाज्यातून २८ हजार क्युसेसच्या आसपास पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी काठच्या गावांना प्रशासणाच्या वतीने सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील पंचाळेक्ष्वर, राक्षसभुवन येथील गोदावरी पात्र दुथडी भरुण वाहत असून पंचाळेक्ष्वर येथील दत्त महाराजाचे आत्मतिर्थ मंदिर पाण्याखाली गेले आहे. हे क्षेत्र राक्षसभुवन येथील शनीमहाराजाची मुर्ती पाण्याखाली गेली आहे. नाशिक जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात पावसाची सततधार होत असल्यामुळे धरण क्षेत्रात पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
जायकवाडीच्या १८ दरवाज्यातून २० हजार क्युसेसच्या आसपास पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे हिरडपुरी, बंधाऱ्याचे दार उघडे केले आहे. त्यामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमानात गोदावरीत होत असून गेवराई तालुक्यातील सुरळेगाव पंचाळेक्ष्वर, राश्रसभुवन, खामगाव, आगर, नादर, संगम जळगाव, आदी गावाना प्रशासणाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदाकाठच्या जमिनी पूर्ण पाण्याखाली गेल्या आहेत. काही गावात पाणी घुसण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन पुरपरिस्थीतीकडे लक्ष देऊन आहे.
गेल्या वर्षी अशीच पुरपरिस्थीती निर्माण झाली होती. त्यावेळी काही गावचा संपर्क तुटला होता. त्यामुळे एनडी, आरयफ टीम तैनात करण्यात आल्या होत्या. तशीच परिस्थीती याही वर्षी होण्याची शक्यता आहे. शनी महाराज मंदिर परिसरात पाण्याचा वेढा पडला असून गोदावरी पात्रात पाणी वेगाने वाढत आहे. पाण्याची आवक अशीच राहिल्यास पुर परिस्थीती निर्माण होईल. त्यामुळे गोदाकठच्या गावाना संतर्कतेचे आदेश प्रशासणाच्या वतीने देण्यात आले आहे.