Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

विजेच्या धक्क्याने कन्नड तालुक्यातील नावाडी इथे चौघांना जीव गमवावा लागल्याची घटना

औरंगाबाद : विजेच्या धक्क्याने कन्नड तालुक्यातील नावाडी इथे चौघांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच वैजापूर तालुक्यातील बायगाव वस्तीमध्ये पुन्हा असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये दोन बैलांसह दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील बोअरच्या कामासाठी टाकलेल्या विजेच्या तारांचे स्पर्श बैलगाडीला झाला आणि वीजप्रवाह गाडीत उतरुन एकाला धक्का बसला. त्याला वाचविण्यासाठी आलेल्या भावाला देखील विजेचा धक्का बसल्याने बैलासह दोन सख्ख्या भावांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. साहेबराव गणपत पाटील चेळेकर वय-७० व त्यांचे लहान बंधू बाबुराव गणपत पाटील चेळेकर वय-५७ वर्ष (रा.बायगाव वस्ती, तालुका वैजापूर) अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही भावांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैजापुर तालुक्यातील बायगाव इथल्या चेळेकर वस्तीवर राहणारे साहेबराव गणपत चेळेकर हे बुधवारी संध्याकाळी पाऊस पडून गेल्याने शेतातील कामे उरकून जुना बायगाव – देवगाव रंगारी गाडीवाटेने लोखंडी बैलगाडी हाकत घराकडे येत होते. त्याच रस्त्यावर दुसऱ्या एका शेतकऱ्याचे विनापोल बोअरवेलसाठी गेलेले आणि रस्त्यावर लटकलेले वीजवाहक केबल आणि सर्व्हिस वायर बैलांच्या शिंगात अडकले. यामुळे वीज प्रवाहाच धक्का बसून तो बैल जागीच ठार झाला.

या घटनेनंतर शिऊरचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह उपनिरीक्षक ए.जे. नागटिळक, पोलीस कर्मचारी जाधव, पवार यांनी देवगाव रंगारी ग्रामीण रुग्णालयात येऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद शिऊर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. दरम्यान, साहेबराव चेळेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातू, पणतू तर बाबुराव चेळेकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button