पोलीस भरतीचा मार्ग मोकळा; राज्यात 12,538 पोलीस शिपाई भरती होणार – गृहमंत्री अनिल देशमुख
राज्यातील तरूणांसाठी मोठी बातमी आहे. पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने पोलीस दलात शिपाई संवर्गातील 12 हजार 538 पदे भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 5 हजार 297 पदांची भरती केली जाईल. याची प्रक्रियाही सुरू झाली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे
गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला व त्याची जाहिरात देखील प्रसिद्ध केली होती. मात्र, एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबवली होती.
पहिल्या टप्प्यात 5 हजार 297 पदांची भरती केली जाणार आहे. तसेच त्यानंतर लवकरच भरतीचा दुसरा टप्पाही पूर्ण केला जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
12 हजार 538 पदाव्यतिरिक्त आणखी पदांची गरज भासल्यास मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून भरतीचा निर्णय घेतला जाईल. सध्या मात्र पहिल्या 5 हजार 297 पदांची भरती केली जाईल.