breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई, ठाण्यात तुफान पाऊस; रत्नागिरीत पावसाची विश्रांती

मुंबई – भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह राजयातील इतर भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली.

ठाण्यात तुफान पाऊस

सलग दोन ते तीन दिवस पावसाने मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात देखील हजेरी लावली आहे. तसेच ते येत्या तीन ते चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी सखल भागात पाणी साचायला देखील सुरवात झाली आहे

मुंबईला जाण्यासाठी ज्या पद्धतीने वाहतूक रस्त्यावरती दिसून येत होती मात्र आज मध्ये त्याप्रमाणे मात्र आज तुरळक प्रमाणात गाड्या रस्त्यावरती धावताना दिसत आहे. तसेच हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे नागरिकांनी घरीच बसून राहावे असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.

रत्नागिरीत पावसाची विश्रांती

रत्नागिरीत पहाटेपासून पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली आहे. रात्रीपासून अनेक ठिकाणी पाऊस कोसळला. तर सकाळपासून पूर्णतः ढगाळ वातावरण आहे. तर आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा देण्यात आलाय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button