Uncategorizedताज्या घडामोडीपुणे

स्वातंत्र्यदिनी असं कधीच घडलं नव्हतं!, पिसर्वे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

पुणे : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गावाने आज खऱ्या अर्थी विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करून विधवा प्रथा मोडीत काढण्याचा व त्याच विधवा महिलांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा पॅटर्न राज्यात चर्चेत आहे. आता पिसर्वे ग्रामपंचायतीने पुढचं पाऊल टाकलं आहे.

पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेमध्ये परंपरेने चालत आलेली अनिष्ठ विधवा प्रथा मोडण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पिसर्वे गावचे सरपंच बाळासाहेब कोलते यांनी दिली. पिसर्वे ग्रामपंचतीच्या इतिहासात पहिल्यांदा या ग्रामसभेससाठी महिलांची मोठी उपस्थिती पहायला मिळाली. सरपंच बाळासाहेब कोलते यांनी मांडलेला ठराव व सदस्या योगिता कोलते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व गावकऱ्यांनी हात उंचावत विधवा प्रथा मोडण्याचा ठरावाला संमती दिली.
दरम्यान, हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर उपस्थित सर्व विधवा महिलांना गावातील जेष्ठ नेते श्रीरंग वायकर व ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी-कुंकू, बांगड्या, व साडीचोळी देऊन सन्मानीत करण्यात आले. याबाबत एका विधवा महिलेने आपली प्रतिक्रिया दिली. मी एक विधवा महिला आहे. आमच्या गावाने आज विधवा महिलांसाठी विधवा प्रथा बंद करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आज सर्व गावासमोर आम्हाला हळदी कुंकू देऊन बांगड्या, साडी चोळी देऊन सन्मान केला. जिथे पतीच्या मागे आपलं कोण? अशी चिंता होती तिथे आज खूप समाधान वाटलं, आमच्यासाठी देखील कोणीतरी आहे. असे भावनिक उद्गार रोहिणी सुर्यवंशी यांनी काढले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button