breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मालिका जिंकण्यासाठी ‘या’ खेळाडूंना भारतीय संघात संधी

मुकेश कुमारला मिळणार पदार्पणाची संधी

मुंबई : भारतविरूद्ध श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका 1-1 ने बरोबरी झाली आहे. आज तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना मालिकेतील शेवटचा सामना असल्यामुळे दोन्ही संघाला जिंकने महत्वाच आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या आपल्या संघात मोठा बदल करणार आहे. तिसऱ्या सामन्यात हार्दिक नविन खेळाडूंना संधी देणार आहे.

पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघात संधी देण्यात आलेल्या शुभमन गिलला या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. दोन्ही सामन्यात त्याने हवी अशी खास कामगिरी केलेली नाही. त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी दिली जाऊ शकते. तर चौथ्या क्रमांकावर राहुल त्रिपाठीला अजुन एक संधी मिळू शकते. सोबतच सहाव्या क्रमांकावर असलेल्या दीपक हुड्डाच्या जागी वॉशिग्टन सुंदरला संघात संधी मिळू शकते. सुंदर आणि ऋतुराजला श्रीलंकेविरूद्धच्या एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही.

दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाज अर्शदीपने 7 नोबॉल टाकले. त्याचबरोबर युझवेद्र चहलने काही खास कामगिरी केलेली नाही. त्यामुळे या दोघांना संघातुन बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. अर्शदीपच्या जागी मुकेश कुमारला पदार्पणाची संधी मिळू शकते. तर अक्षर पटेलला फिरकीपटू म्हणून संघात टिकू शकतो. त्याने गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली आहे.

श्रीलंकेविरूद्धच्या तीसऱ्या टी20 सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ :

इशान किशन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिग्टन सुंदर, उमरान मलीक, शिवम मावी, कुलदीप यादव, मुकेश यादव.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button