breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीचे आमदार ‘ऑन’फिल्ड अन्ं स्थायी सभापतीची भूमिका संशयास्पद

पिंपरी |महाईन्यूज|

आगामी वर्षभरात शहरातील पाणीपुरवठा सुरळित करण्याचा दावा भाजप आमदार, पदाधिका-यांकडून केला जात आहे. मात्र, दुसरीकडे पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी काढलेल्या कामांना अर्थकारणासाठी स्थायी समितीकडून खोडा घातला जात आहे. पाणीपुरवठा जलवाहिनी टाकणे व टाक्या बांधण्यांच्या 66 कोटींचा खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावला. या तडकाफडकी निर्णयामुळे स्थायीचे आर्थिक गणित फिस्कटल्याची चर्चा होत आहे.

पिंपरी-चिंचवडला दीड वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. हा पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी सत्ताधारी भाजपने मागील चार वर्षात अनेक कामे काढली आहेत. परंतु, यातील 24 तास पाणीपुरवठ्यची कामे झाली. तरीही पाणी सुरळित झालेले नाही. त्यानंतर त्याचाच एक भाग म्हणून पाणीपुरवठा विभागामार्फत सुरळित पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकणे व पाण्याच्या टाक्या बांधण्याची कामे केली जात आहे. दोन टप्प्यातील कामे सुरू असून तिस-या टप्प्यातील काम पाणीपुरवठा विभागाने काढले.

यामध्ये भोसरी, वाकड, थेरगाव आणि प्राधिकरण भागातील काही कामे करण्यासाठी 64 कोटी 65 लाखांची निविदा काढण्यात आली होती. निविदाप्रक्रियेनुसार मे. गुडविल क्न्स्ट्रक्शन यांनी  66 कोटी 91 लाख इतक्या ज्यादा दराने करण्याची तयारी दर्शविली. यामध्ये जलवाहिन्या टाकण्याबरोबर शहरात 9 ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. पाणीपुरवठ्याचा कोणताही प्रस्ताव न अडविणा-या स्थायी समितीने बुधवारी अचानक हा मोठ्या कामाचा विषय फेटाळून लावला. स्थायीने एकत्रित कामाऐवजी वेगवगेळी कामे काढण्यासाठी असा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.  त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यामागे स्थायी समितीचे अर्थकारण आहे का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

———–
आमदार ऑनफिल्ड, पदाधिका-यांची भूमिका संशयास्पद
आंद्रा, भामा आसखेड धरणातील 137 एमएलडी पाणी चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्रात आणले जाईल. तेथून ते शहरात पुरविले जाणार आहे. चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्राचे काम वेगाने सुरू आहे. भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यासह सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवक हे पाणी मिळाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळित होणार असल्याचे सांगत आहेत. आमदार वारंवार आढावा घेऊन पाण्यासाठी ऑन फिल्ड असल्याचे दाखवतात. प्रत्यक्षात त्यांच्याच पदाधिका-यांकडून स्थायी समितीत अशा कामांना खोडा घातल्याने भाजपच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होत आहे.
————–

यापूर्वी कामे झाली असतील, परंतु आता एकत्रित काम काढल्यामुळे कामास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या कामाचा प्रस्ताव दप्तरी दाखल करून वेगवेगेळी कामे काढण्याचे आदेश दिले आहेत.
– अॅड. नितीन लांडगे, अध्यक्ष, स्थायी समिती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button