Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धे २०२३ मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्या १० दिवसांत ६९ पदके जिंकणाऱ्या भारताने ११व्या दिवशी ७१ पदके जिंकली आहेत. भारताची आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली ते जाणून घेऊया..
पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा या दिल्ली येथे झाल्या होत्या आणि यजमान भारताने एकूण ५१ पदके जिंकली. यामध्ये १५ सुवर्ण, १६ रौप्य आणि २० कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर होता. मात्र, यानंतर भारताला ५० पदके मिळविण्यासाठी ३१ वर्षे वाट पाहावी लागली. १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १३ सुवर्णांसह ५७ पदके जिंकली होती. १९५४ मध्ये भारताने एकूण १७ पदके जिंकली आणि १९५८ मध्ये केवळ १३ पदके जिंकली होती, तर १९५१ मध्ये भारताने १५ सुवर्ण जिंकले.
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पुन्हा लांबणीवर; २८ नोव्हेंबरला होणार सुनावणी
INDIA HAS CREATED HISTORY….!!! 🇮🇳
71st medal in Asian Games, their best performance over, going past 70 medals in 2018.
– A great day in Indian sporting history. pic.twitter.com/D5AS2SA1aG
— Johns. (@CricCrazyJohns) October 4, 2023
१९९० मध्ये भारताकडे केवळ २३ पदके होती. यामध्ये एकच सुवर्णपदक होते. २००६ मध्ये प्रथमच भारताने घरापासून दूर ५० हून अधिक पदके जिंकली. तेव्हापासून भारत सतत ५० हून अधिक पदके जिंकत आहे. २०१० मध्ये, भारताने ६५ पदके जिंकली आणि सर्वाधिक पदकांचा नवा विक्रम केला. २०१८ मध्ये, भारताने यात आणखी सुधारणा केली आणि ७० पदके जिंकली. आता २०२३ मध्ये, भारताने ७१ हून अधिक पदके जिंकली आहेत आणि इतर अनेक स्पर्धांमध्ये खेळाडूंनी अंतिम फेरी गाठून पदके मिळवली आहेत. यंदा भारताच्या झोळीत १०० पदके येतील अशी अपेक्षा आहे.





