breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारताचा ऑस्ट्रोलियावर सहा गडी राखून विजय; मालिकेत २-० ने आघाडी

रवींद्र जडाजाने घेतले १० बळी, तर अश्विनने घेतले ६ बळी

दिल्ली : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने सहा गडी राखून जिंकला आहे. यासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होतला. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने २६५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून गोलंदाज मोहम्मद शमीने चार, तर अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले.

प्रत्युत्तरात भारतीय संघाची खराब सुरूवात पाहायला मिळाली. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आणि अश्विनने चांगली फलंदाजी केली. तर ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज नॅथन लायनने पाच बळी घेतले. यावेळी भारताने २६२ धावा केल्या.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघ अवघ्या ११३ धावांत गारद पडला. भारतीय गोलंदाज जडेजाने सात विकेट घेत ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का दिला. तर अश्विनने तीन बळी घेतले. भारतासमोरील ११३ धावांचे लक्ष चार विकेट गमावून गाठले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button