breaking-newsक्रिडा
सचिन-सेहवागने केलेल्या कामगिरीची रोहितकडून पुनरावृत्ती
पहिल्या दोन कसोटी सामन्यांत विजय मिळवल्यानंतर रांची कसोटीतही भारतीय संघाने धडाकेबाज खेळ केला आहे. सलामीवीर रोहित शर्माचं द्विशतक, अजिंक्य रहाणेचं शतक आणि अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ९ गड्यांच्या मोबदल्यात ४९७ डावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीने भारताचा पहिला डाव घोषित केला. रोहित शर्माने या सामन्यात आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करत २१२ धावांची खेळी केली.