breaking-newsक्रिडा
‘भारतीय खेळाडूंची विक्रमी कामगिरी हे चांगल्या दिवसांचे संकेत’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/sachin-1-696x39.jpg)
भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा खेळाडूंचे नेहमीच कौतुक करताना आपण पहिले आहे. स्वतः मोठा खेळाडू राहिल्याने त्याला देखील खेळाडूंच्या मेहनतीचे महत्त्व माहिती आहे. त्यामुळे तो नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभा असतो.
नुकत्याच जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत भारतीयांनि आपली सर्वोत्तम कामगिरी दिली. त्यात १५ सुवर्ण पदके, २६ रौप्यपदके तर ३० कांस्यपदकांचा समावेश आहे. त्यामुळे सचिनने ट्विट करत खेळाडूंचे अभिनंदन केले.
“आपण या स्पर्धेतील प्रत्येक खेळात उत्तम होतो. आपल्या खेळाडूंची विक्रमी कामगिरी ही येणाऱ्या चांगल्या दिवसांचे संकेत आहेत. सर्व खेळाडूंचे, पदक विजेत्यांचे आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन. ६९ पदके ही भारतासाठी मोठी कामगिरी आहे.”