इसमे तेरा घाटा…लोकेश राहुलवरुन झहीरचा टीम इंडियाला टोला

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला वन-डे मालिकेत चांगलाच धक्का बसला. टी-२० मालिका ५-० ने जिंकल्यानंतर भारतीय संघाला वन-डे मालिकेत ३-० ने पराभव स्विकारावा लागला. यानंतर २१ फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा खेळणार नसल्यामुळे मयांक अग्रवालच्या सोबतीला कोणाला संधी मिळणार हा प्रश्न आहे.
या मालिकेत भारतीय निवड समितीने लोकेश राहुलला कसोटी संघात स्थान दिलेलं नाहीये. यावरुन भारताचा माजी गोलंदाज झहीर खानने नाराजी व्यक्त केली आहे. “या दौऱ्यात भारत फक्त दोन कसोटी सामने खेळणार आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी भारतीय संघ जास्तीकरुन टी-२० आणि वन-डे सामने खेळणार आहे. मला हाच मुद्दा मांडायचा होता. राहुल सध्या ज्या फॉर्मात आहे, त्याचा वापर भारतीय संघाला करुन घ्यायला हवा होता.” झहीर Cricbuzz संकेतस्थळाच्या कार्यक्रमात बोलत होता.





