breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयराजकारणराष्ट्रिय

धक्कादायक ! सरकारे पाडण्यासाठी भाजपने केला 6 हजार 300 कोटींचा खर्च ः अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली । महान्यूज ।

भारतीय जनता पार्टी पक्षाने सरकार पाडण्यासाठी तब्बल 6 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च केल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाने सरकार पाडण्यासाठी तब्बल 6 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च केल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी भाजपवर जोरदार टिका केली आहे.

“भाजपने देशात वेगवेगळ्या पक्षांचे सरकार पाडण्यासाठी तब्बल 6 हजार 300 कोटी रूपये खर्च केले आहेत. हा खर्च भाजपाने केला नसता तर, केंद्र सरकारला खाद्य पदार्थांवर GST लावायची वेळ आली नसते”, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. तसेच, “राज्य सरकारांचे सिरीयल किलर”, असा टोलाही केजरीवाल यांनी भाजपाला लगावला.

दिल्ली विधानसभेत बोलत असताना केजरीवाल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले. यावेळी “पेट्रोल-डिझेल आणि जीएसटीच्या दरवाढीतून जमा झालेल्या पैशातून भाजपाने आमदारांना विकत घेत आहे”, असाही आरोप केजरीवाल यांनी केला. याशिवाय, “भाजप करोडो रूपये खर्च करून विरोधी पक्षातील आमदार विकत घेवून राज्यात सरकार अस्थिर करत आहे”, असा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर केला आहे.

“दही, ताक, मध, गहू, तांदूळ इत्यादींवर जीएसटी लावण्यात आला आहे. या पदार्थाच्या माध्यमातून केंद्र सरकारला सुमारे 7 हजार 500 कोटी रूपये मिळाले आहेत. वेगवेगळ्या राज्यातील सरकार पाडण्यासाठी त्यातील 6 हजार 300 कोटी रूपये खर्च केले आहेत. जर त्यांनी सरकार पाडली नसती तर गहू, तांदूळ, दही, यांसारख्या खाद्य पदार्थांवर GST लावण्याची गरज लागली नसती. लोकांना पण महागाईचा सामना करावा लागला नसता”, असे केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button