breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘कुणाला सोडून जायचं असेल, तर..’; शरद पवारांचं सूचक वक्तव्य

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. परंतु अजित पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित नसल्याने पुन्हा त्यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून झाले हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.

देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही, असं शरद पवार म्हणाले.

कुणाला सोडून जायचं असेल, तर मग कोणत्याही पक्षाचा असो कोणी थांबवू शकत नाही. अशी परिस्थिती असेल तर पुढाकार घेत, याबद्दल असं घडवू शकतो, याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे मला समजतं, असं शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button