breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

भाजप-शिवसेना युती कोणामुळे तुटली? शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या लोक माझी सांगाती या आत्मचरित्रातून अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. भाजपने शिवसेनेसोबत युती तोडली असा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून केला जातो. मात्र शिवसेना भाजप युती कोणामुळे तोडली गेली याबाबत देखील शरद पवारांनी खुलासा केला आहे.

२०१४ मध्ये शिवसेना भाजप युती टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालवला. सर्वात मोठा पक्ष असूनही कमीपणा घेत शिवसेनेबरोबरचं नातं मजबूत करण्याची धडपड करताना ते (देवेंद्र फडणवीस) दिसत होते. त्याचबरोबर पक्ष वाढिण्यासाठी फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांचीही शरद पवार यांनी कौतूक केलं आहे. शिवसेनेशी असलेलं नातं एकीकडे टिकवत असताना दुसरीकडे भाजपचा विस्तार करायचा, पक्षाची ताकद वाढवायची, असं त्यांचं एकंदरीत उद्धीष्ट दिसत होतं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

स्वपक्षाची ताकद फडणवीस वाढवताहेत, हे शिवसेनेला थोडं उशिरा उमगलं. फडणवीस यांचं खरं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेसच होती, असं सांगताना शरद पवार यांनी त्यामुळे आम्ही सावध झालो होतो. त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भूमिकेवर देखील नाराजी व्यक्त केली आहे.

भाजप-शिवसेनेतील फारकत आणखी वाढली, तर काही घडवता येईल, हे स्पष्ट असूनही काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्वही त्यासाठी फारसं आग्रही नव्हतं. किंबहुना, लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मानसिकतेत एक बदल झाला होता, असंही शरद पवार म्हणतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button