‘राजू शेट्टी मांजराची जात, त्यांनी लोकांचा घात केलाय’; सदाभाऊ खोत यांची खोचक टीका
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार असल्याची चर्चा आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे राजू शेट्टी यांच्यावर नाराज असून बंड करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर खोचक टीका केली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, राजू शेट्टी यांनी संघटनेत काम करणाऱ्या लोकांचा घात केला आहे. राजू शेट्टी हा मांजरीचा जात आहे. बोका कसा आपल्या पिल्लांना मारतो तसा हा बोका आपल्या पिल्लांना मारतो.
हेही वाचा – राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी रुग्णालयांमध्ये मिळणार मोफत उपचार
रविकांत तुपकर हे विदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम गेल्या वीस वर्षापासून करत आहेत. परंतु त्यांना काम करत असताना अनेक अडचणी येत होत्या, त्या संदर्भात त्यांनी माझ्यासोबत सुद्धा चर्चा केली होती. हे सुद्धा या प्रकरणांमुळे अस्वस्थ होते आता ते बुलढाणा जिल्ह्यामधून खासदारकीची तयारी करत आहेत, परंतु माझ्यासोबत सुद्धा असाच प्रकार जो आहे तो राजू शेट्टी यांनी केलेला आणि बहुजन नेत्यांना संघटनेमध्ये दाबण्याचे काम राजू शेट्टींनी केलं आहे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.