Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘…तर पाकिस्तानवर तहानेने मरण्याची वेळ येईल’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला, यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. या हल्यानंतर भारताने मोठं पाऊल उचलत काही महत्वाचे निर्णय घेतले. पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले, तसेच सिंधू पाणी करारही स्थगित केला. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

या बरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश देत ज्या त्या राज्यातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या संदर्भात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की जे लोक व्हिसा घेऊन पाकिस्तानमधून आले आहेत. त्यांना नोटीसा दिल्या असून ते पुन्हा जात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. तसेच पाकिस्तान ज्या पाण्यावर निर्भर आहे, ते पाणी जर भारताने आडवणं सुरु केलं तर पाकिस्तानवर अक्षरश: तहानेने मरण्याची वेळ येईल’, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“जे लोकं पाकिस्तानमधून या ठिकाणी व्हिसा घेऊन आलेले आहेत, त्यांची सर्व माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. जर कोणी अवैधरित्या आलं असेल तर त्यांनाही शोधण्याची कारवाई सुरू असते. ज्या प्रमाणे अवैध बांगलादेशी आपल्याकडे सापडतात, तसं अवैध पाकिस्तानी सापडत नाहीत. त्यामुळे आता पहिल्यांदा जे लोक व्हिसा घेऊन पाकिस्तानमधून आलेले आहेत. त्यांना पहिल्यांदा ४८ तासांत बाहेर काढायचं आहे. त्या संदर्भात पोलीस व्यवस्थित काम करत आहेत”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा –  चाकणच्या वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार

“खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला हे समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता ही भारतावर आहे. त्या प्रकारे ते दहशतवाद्यांना समर्थन देतात आणि मानवतेचा एक प्रकारे खून करतात. मला असं वाटतं जगातला कुठलाही देश पाकिस्तानबरोबर उभा राहू शकत नाही. ही पाकिस्तानची परिस्थिती आहे. त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत आणि ते न्यू क्लिअर बॉम्बचं काय सांगतात?”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भारताने २३ एप्रिल रोजी काही महत्वाचे निर्णय घेत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले. तसेच सिंधू पाणी करारही स्थगित केला. या सिंधू पाणी करारासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “त्या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे, ते पाणी जर भारताने आडवणं सुरु केलं तर पाकिस्तानवर अक्षरश: तहानेने मरण्याची वेळ येईल. त्यामुळे अशा प्रकारची जागा दाखवावी लागते”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान, या सहा परिवारांना जी काही मदतीची आवश्यकता लागेल ती सर्व मदत राज्य सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button