१ एप्रिलपासून मालमत्ता कराची थकीत वसुली सुरु केली जाईल
मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव जवळपास संपुष्टात आल्याने आणि सर्व जनजीवन सुरळीत झाल्याने आता पालिका प्रशासनाने कोरोना काळात मालमत्ता कराची जी थकबाकी होती ती १ एप्रिलपासून वसूल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावर नवा आर्थिक भार पडणार आहे.
२०२० मध्ये कोरोनाचे संकट असल्याने आणि या संकट काळात उद्योगधंदे बंद असल्याने मुंबईकर जनतेकडून मालमत्ता कर वसूल केला जाऊ नये अशी मागणी पालिकेतील नगरसेवकांनी केली होती. ती मान्य करण्यात आली. त्यामुळे मार्च २०२० पासून पालिकेने मालमत्ता कर घेणे बंद केले होते. पण आता कोरोनाचा संकट काळ टळलेला आहे. सर्व उद्योगधंदे सुरु झालेले आहेत, त्यामुळे लोकांची आर्थिक गाडी हळू हळू रुळावर येत आहे. त्यातच पालिकेची मुदत संपल्याने आणि पालिकेवर प्रशासक आल्याने पालिका प्रशासनाने मालमत्ता कराची वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या १ एप्रिलपासून मालमत्ता कराची थकीत वसुली सुरु केली जाईल. मुंबईत ५०० चो.फु. पर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून यापूर्वीच वगळण्यात आलेले आहे त्यामुळे इतरांना मात्र हा मालमत्ता कर भरावाच लागणार आहे. काही मुंबईकरांना मात्र पालिकेच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली असून मुंबईकरांनाविश्वासात न घेता पालिका प्रशासनाने हा निर्णय घेणे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया मुंबई कर जनता व्यक्त करीत.