‘येत्या दीड महिन्यात लोकसभा निवडणुका लागणार’; प्रकाश आंबेडकर यांचं सूचक विधान
मुंबई : पुढील वर्षी दोशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधकांची इंडिया आघाडीही तयार झाली आहे. या इंडिया आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपने एनडीएचं पुनरूज्जीवन केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाकीत केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभेच्या निवडणुका महिना दीड महिन्यात होतील. दीड महिन्यात होतील. दीड महिन्यानंतर विचारा कशा काय होतील? त्यावेळी सांगतो. आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागलो आहोत. भाजपच्या विरोधात लढू. आमचे उमेदवार उभे करू.
हेही वाचा – राहुल गांधींच्या फ्लाईंग किस वरून महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल!
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी गंभीर आरोप केला. माझा हा आरोपच आहे की मणिपूर हिंसाचार हा अदानीसाठीस सुरू आहे. खनिजावर ताबा हा अदिवासींचा आहे. मैतेई समुहाने आरक्षणाची मागणी केली आहे. अचनाकपणे मैतेई समाजाला अदिवासी का घोषित केलं गेलं? संविधानानुसार पहाडी इलाक्यात तिथे आदिवासी कैन्सिल असतात. तिथे राही करायचं असेल तर अदिवासींची परवानगी घ्यावी लागते. त्यांना अदानी आणि इतरांना मायनिंग दिल्या. पण हिल कौन्सिल त्याला मंजुरी देत नाहीये. त्यामुळे या खाणीच्या मंजुरीसाठीच मैतेई समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीशी आमचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेसोबत आमची युती आहेच. महाविकास आघाडीशी आमचा संबंध नाही. त्यामुळे निवडणुकीत काय करायचं हे महाविकास आघाडीने त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही शिवसेनेसोबत आहोत. त्यांनी त्यांचं पाहावं. आम्ही का डोकं लावावं? आम्ही का आमचा बीपी वाढवून घ्यावा? आमची आघाडी शिवसेनेसोबत आहे. आमचा समझौता शिवसेनेसोबत होईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.